शब्द बोलू लागले
पेन आला हाती
शब्द उमटू लागले
भाव अंतरंगातले
आज बोलू जाहले ।
गदारोळ त्यांचा होता
बांध मी हो घातले
गर्दी नको विषयांची
तर भाव हे गोठले ।
व्यक्त होण्याची सारे
वाट शोधत होते
मुक्तीच्या आशेत आज
स्वच्छंद बागडत होते ।
सारे अगदी दाटलेले
मत मांडत होते
फरक नसेल जरी
कोणास , सांगत सारे होते ।
स्वच्छंद हवेत उडाले
भार हलके झाले
दखलपात्र नसले तरी
कागदावरती आले ।
कागदाचा मात्र भार
आज वाढला आहे
वाचून हलके करेल
आस ही त्यास आहे ।
भावनांचा भार हा
त्यासही पेलवला नाही
भरकटला तो ही
त्यांसवे दिशा दाही ।।
- आरु
Mast
ReplyDeleteSundar👌
ReplyDeletewahhh ....bharich..
ReplyDeleteNice
ReplyDeleteइश्क का गुनाहगार कया इतना जल्दी और इतने सस्ते में छूट सकता है????
ReplyDeleteWaah..... Very nice
ReplyDelete